शुध्द सच्चिदानंद परमेश्वराचा अवतार ही त्याची एक लीला आहे. परमेश्वर अवतार
धारण करून दुष्टांचा संहार करतात आणि सज्जनांन प्रेमानंद देतात. लोककल्याणासाठी
आदर्श लीला करतात. भगवंतास शरण जाणे हीच मनुष्यजन्माची सार्थकता आहे. सत्य हाच
परमधर्म आहे. सत्यासाठी धन, प्राण, ऎश्वर्य या सर्वांच त्याग सहजतेने केला पाहिजे.
मनुष्यजन्माचे अंतिम परमेश्वर प्राप्ती हेच आहे. ते उद्दिष्ट कर्मयोगाच्या आचरणाने
प्राप्त होऊ शकते. त्यासाठी वर्णाश्रमाचे आचरण अत्यंत आवश्यक आहे. माता-पित्याची
सेवा करणे हे पुत्राचे परम कर्तव्य आहे. स्त्रीयांसाठी पतिव्रता-धर्माचे पालन
आवश्यक आहे. पुरूषांसाठी एकपत्नी व्रताचे पालन आवश्यक आहे. भावासाठी सर्वस्वाचा त्याग करून भावासाठी सुख प्रदान करावे.
श्रीरामाच्या वनवासामध्ये लक्ष्मणाने श्रीरामाची सेवा करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग
करून वनामध्ये गेला. धर्मात्मा राजासाठी प्रजेने आपले प्राणार्पण करणे हेच प्रजेचे
कर्तव्य आहे. श्रीरामासाठी युध्दामध्ये वानरसेनेने आत्मबलिदान केले. दुष्टराजाच्या
अन्यायाचे समर्थन करू नये. दुष्ट-सख्या भावाच्या विरोधामध्ये ऊभे रहाणे हाच
परमधर्म आहे. अहंकारी रावणाच्या विरोधामध्ये बिभिषण ऊभा राहिला होता. प्रजा
रंजनासाठी आपल्या प्राण-प्रिय माणसाचा त्याग करणे हे आदर्श राजाचे कर्तव्य आहे. श्रीरामाने
प्रजेसाठी सीतेचा त्याग केला होता. स्त्रियांवर अत्याचार करण्याने शक्तीशाली
सम्राटांचा सुध्दा विनाश होतो. शक्तीशाली रावणाने सीतेचे हरण केल्यामुळे त्याचा
अंत झाला. निष्कामतेने सदा सर्वदा परमेश्वराची सेवा करावी. हनुमानाने निष्कामतेने
सदा सर्वदा श्रीरामाची सेवा केली. सवतीच्या पुत्रांवर सुध्दा प्रेम करावे.
कौसल्या, सुमित्रेने भरत व शत्रुघ्नावर प्रेम केले होते. राजाने सदैव ब्राह्मणांचा सत्कार करावा. अन्यायाचा
नेहमी विरोध करावा. शिवधनुष्य भंग समयी लक्ष्मणाने परशूरामाचा विरोध केला होता.
साधुसंताच्या रक्षणासाठी सदॆव तत्पर असावे. कुमारवयामध्ये श्रीराम-लक्ष्मणाने
विश्वामित्राच्या यज्ञाचे रक्षण केले होते. आपल्याशी दुष्ट भावनेने वागणाऱ्याशी
सुध्दा आपण चांगले वागावे. श्रीराम कैकयीशी चांगलेच प्रेमाने वागत होते. भगवंताची
चरणरज प्रेमाने मस्तकी धारण केल्याने जड वस्तुला सुध्दा चैतन्य प्राप्त होते. श्रीरामाच्या चरणरज स्पर्शाने अहिल्येच्या
शीळेचा उध्दार झाला. श्रीरामाचा अवतार हा आदर्श अवतार
होता. म्हणून कुमार अवस्थेमध्ये रामायणाचा अभ्यास करून मनुष्य-जन्माची सार्थकता
प्राप्त करून घ्यावी.
No comments:
Post a Comment