आयुर्वेदाचा इतिहास आयुर्वेदाचा उगम अथर्ववेदातून झालेला
आहे. वैदिक कालानंतर
आयुर्वेदाच्या मूळ सिध्दांतांना
उन्नत स्वरूप प्राप्त
होऊन आयुर्वेदाचे चरक, सुश्रुत व वाग्भट हे तीन मुख्य संहिता ग्रंथ निर्माण झाले. त्यांना आयुर्वेदाची
बृहत्रयी असेही म्हणतात.
या बृहत्रयीतील पहिला ग्रंथ इसवी सन पुर्व दुसरे शतकामध्येे
चरकसंहिता या नावाने
निर्माण झाला. चरकसंहिता
मुख्यत्वेकरून कायचिकित्सेसाठी प्रसिध्द
आहे. त्यावर प्रमुख
टीकाग्रंथ (१)आयुर्वेददीपिका--चक्रपाणी, (२)निरंतरपदव्याख्या--जेज्ज्ट, (३)चरकन्यास--भट्टार हरचंद्र,
(४)चरकपंजिका--स्वामिकुमार, (५)तत्त्वचंद्रिका--शिवदास सेन, (६)जल्पकल्पतरू--गंगाधर रॉय, (७)चरकोपस्कार--योगीद्रनाथ सेन, (८)चरकप्रदिपिका--ज्योतिषचंद्र सरस्वति
या सर्व टीका साधारणपणे सहाव्या
शतकापासून अकराव्या शतकापर्यंत
रचलेल्या आहेत. बृहत्रयी
तील दूसरा ग्रंथ सुश्रुतसंहिता या नावाने दुसया शतकामध्ये निर्माण
झाला. सुश्रुतसंहिता शल्यचिकित्साप्रधान आहे. त्यावर प्रमुख
टीकाग्रंथ (१)न्यायचंद्रिका--गयदास, (२)भानुमती--चक्रपाणी, (३)निबंधसंग्रद--डल्हण, (४)सुश्रुतार्थसंदीपन--हाराणचंद्र या सर्व टीका साधारणपणे दहाव्या
शतकापासून अकराव्या शतकापर्यंत
रचलेल्या आहेत. बृहत्रयी
तील तिसरा ग्रंथ अष्टांगसंग्रह ही प्रथम वाग्भटाची
संहिता दुसया शतकामध्ये
निर्माण झाली. अष्टांगसंग्रहात आयुर्वेदाच्या
सर्व आठही पध्दतींचे
एकत्रित विवेचन आहे. त्यामुळे या एकाच ग्रंथाचा
अभ्यास केला तरी आयुर्वेदाचे ज्ञान मिळू शकते. या अष्टांगसंग्रहाची एकमेव इंदू टीका बाराव्या शतकामध्ये
रचलेली असून त्यास राजमान्यता पावलेली
आहे. याचे प्रथम प्रकाशन १८८८मध्ये
दोन खंडामध्ये झाले. नंतर १९२६ मध्ये त्रिचूर
येथे तीन खंडामध्ये
प्रकाशन झाले. १९७५ मध्ये त्याचे
मराठी भाषांतर प्रसिध्द
झाले. अष्टांगहृदय ही द्वितीय वाग्भटाची
संहिता सहाव्या शतकामध्ये
निर्माण झाली. अष्टांगसंग्रहातील पुषकळसे
अनावश्यक विषय वगळून एक उत्तम लोकोपयोगी असा अष्टांगहृदय नावाचा
ग्रंथ तयार केला. यामुळेच या लोकप्रिय अष्टांगहृदयाच्या असंख्य
टीका नंतरच्या काळामध्ये
प्रसिध्द झाल्या. त्यामध्ये
अरूणदत्त व हेमाद्रि
या प्रामुख्याने सांगता
येतील. इतकेच नव्हे तर परदेशी
भाषांमध्ये सुध्दा याचे अनुवाद झालेले
आहेत. उदा. अष्टांकर--अरबी अनुवाद
आठव्या शतकामध्ये, वैडूर्यभाष्य--तिबेटी अनुवाद
आठव्या शतकामध्ये, तर १९४१ मध्ये जर्मन अनुवाद
प्रसिध्द झालेला आहे. आयुर्वेदाच्या लघुत्रयी
मधील पहिला ग्रंथ शारंगधर संहिता
तेराव्या शतकामध्ये निर्माण
झाली. परप्रांतातील वनस्पतींचे
संशोधन करून नविन कल्प व औषधींची चिकित्सा
हाच विचार येथे प्रामुख्याने सांगितलेला
आहे. या ग्रंथामध्ये
एकूण बत्तीस अध्याय असून पूर्वखंड, मध्यमखंड
व उत्तरखंड अशा तीन खंडांमध्ये
विभागलेले आहेत. त्यावर
प्रमुख टीकाग्रंथ (१)दीपिका--आढमल्ल, (२)बोपदेव
टीका, (३)गुढार्थदिपिका--काशिराम, (४)आयुर्वेददीपिका--रूद्रभट्ट या सर्व टीका सतराव्या शतकानंतर
रचलेल्या आहेत. शारंगधर
संहितेचे १८९२ मध्ये बंगाली भाषेमध्ये
भाषांतर प्रसिध्द झाले. १९२० मध्ये दीपिका व गुढार्थ दीपिका
या टीकांचे संपादन
करून शारंगधर संहिता
पुन्हा प्रकाशित झालेली
आहे. आयुर्वेदाच्या लघुत्रयी
मधील दुसरा ग्रंथ माधवनिदान सातव्या
शतकामध्ये निर्माण झाली. या ग्रंथामध्ये
अनेक नवीन व्याधींचे
स्वतंत्र व विस्तृत
स्पष्टीकरण आहे. या ग्रंथामध्ये आमवात,
वातव्याधी, शूल, अम्लपित्त,
व श्लीपद अशी पाच प्रकरणे
असून एकूण ६९ अध्याय आहेत. त्यावर प्रमुख
टीकाग्रंथ (१)मधुकोष--विजयरक्षित, (२)आंतकदर्पण--वाचस्पती, (३)सुबोधिनी--वासुदेव, (४)वैद्यमनेरमा--रामकृष्ण. त्यानंतर
१९१३ मध्ये माधवनिदान
या ग्रंथाचा इटालियन
भाषेमध्ये अनुवाद प्रसिध्द
झालेला आहे. तर १९८०मध्ये इंग्रजीत
अनुवाद प्रसिध्द झालेला
आहे. आयुर्वेदाच्या लघुत्रयी
मधील तिसरा ग्रंथ भावप्रकाश सोळाव्या
शतकामध्ये निर्माण झाला. यामध्ये अनेक नवीन तत्त्वे
व द्रव्ये यांचा समावेश आहे. तसेच यकृताचे
अतिशय विस्तृत व स्पष्ट वर्णन केलेले आहे. या ग्रंथामध्ये
१०८३१ सूत्रे असून तो पूर्वखंड,
मध्यमखंड, व उत्तरखंड
यामध्ये विभागलेला आहे. त्यावर प्रमुख
टीकाग्रंथ (१)सिध्दांतरत्नाकर--जयदेव,(२)हिंदी टीका--लालचंद्र वैद्य,
(३)हिंदी टीका--विश्वनाथ द्विवेदी.
वैदिक कालानंतर आयुर्वेदामध्ये चिकीत्सेचे
स्वरूप पालटून तर्कसंगत
व शास्त्रीय सिध्दांतांवर
आधारित औषधी चिकीत्सेचे
झाले. हा काळ साधारणपणे आत्रेयांच्या
काळापासून इसवी सनाच्या
सातव्या शतकापर्यंत म्हणजे
मुसलमानांच्या आक्रमणापुर्वीचा आहे. हा कालखंड
पाश्चात्य संस्कृतीमधील हिप्पोक्रॅटिस
व गॅलन याच्या
कालखंडाशी समकालीन आहे. हा कालखंड
म्हणजे आयुर्वेदाचे सुवर्णयुगच
होते. तक्षशिला व नालंदा ही आयुर्वेद विद्यापीठे
या काळात भरभराटीला
येऊन त्यांनी संपूर्ण
जगाचे लक्ष वेधून घेतले होते. अनेक देशातून
शास्त्रज्ञ येथे आयुर्वेदाच्या अभ्यासासाठी
येत असत. त्यानंतर
गौतम बुध्दाचा कालखंड
(इ.पू.४८३) हा एक आयुर्वेदाच्या इतिहासामध्ये
महत्वाचा टप्पा आहे. गौतम बुध्दाच्या
अहिंसेच्या उपदेशामुळे आयुर्वेदातील
शल्य चिकीत्सेचा काही प्रमाणात हास झाला. तरी सुध्दा गौतम बुध्द स्वतः आयुर्वेदज्ञ असल्याने
त्यांनी ठिकठिकाणी हिंडून
आयुर्वेदाची चिकीत्सा केलेली
होती. त्यांनतर विक्रमादित्याच्या काळातही
आयुर्वेदाच्या उत्कर्षाची चढती कमान राहिली
होती. त्यानंतर इसवी सनाच्या सातव्या
शतकापासून म्हणजे परकीयांच्या आक्रमणाचा
कालखंड हा आयुर्वेदाच्या
इतिहासामध्ये अनेक चढउतारांचा
व वळणावळणांचा आहे. इ.स. १००१ ते १०२५ या काळामध्ये
महंमद गझनीने सतरा वेळा आक्रमणे
करून तक्षशिला व नालंदा यासारखी
आयुर्वेद विद्यापीठे उध्वस्त
केली. असंख्य आयुर्वेदाची
हस्तलिखिते जाळून नष्ट केली. त्याचा
काही प्रमाणात विरोध दक्षिण भारतातील
विजयनगरच्या हिंदु साम्राज्याने
केला. म्हणून इ.स. १३६५ ते १५६५ या काळात आयुर्वेदांतर्गत सिध्द चिकीत्सापध्दतीचा उत्कर्ष
झाला होता. त्यामुळे
रसशास्त्राचा मोठ्या प्रमाणात
विकास झाला. इ.स.१५६५
नंतर पुन्हा परकीयांच्या
आक्रमणामुळे आयुर्वेदाला अप्रतिष्ठा
प्राप्त झाली. शल्यकर्म
करणे हीन दर्जाचे
मानले जाऊ लागले.
एकोणीसाव्या शतकात ईस्ट इंडिया कंपनीने
मोंगलाई तसेच पेशवाई
नष्ट करून पाश्चात्य
वैद्यक शिक्षणाचा प्रसार
सक्तीने सुरू केला. त्यामुळेच आयुर्वेदाचे
महत्व कमी झाले. तरीही स्थानिक
संस्थानिकांनी आयुर्वेदाला उदार आश्रय दिलेला
होता. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये
सुध्दा सरकारकडून आयुर्वेदाला
प्रोत्साहन मिळाले नाही. भारत सरकारने
१९४५ साली डॉ. भोर यांच्या
अध्यक्षतेखाली हेल्थ सर्वे अँड डेव्हलपमेंट
कमिटी नेमली. परंतू या कमिटीने
आयुर्वेेदाकडे दुर्लक्ष करून देशी चिकित्सापध्दतीचा निर्णय
स्थानिक राज्य सरकारांनी
घ्यावा असा प्रस्ताव
दिला. त्यामुळे अनेकांनी
तिव्र प्रतिक्रिया व्यक्त
केल्यानंतर सरकारने सर्व राज्य सरकारांच्या
स्वास्थमंत्र्यांचे अधिवेशन घेऊन महत्त्वाचे निर्णय
जाहीर केले (१)केंद्र
व राज्यात आयुर्वेद
व युनानी शास्त्राचे
संशोधन व शिक्षण
यांची व्यवस्था राष्ट्रीय
योजना समितीच्या शिफारसीनुसार
केली जावी. (२)आयुर्वेद
व युनानी चिकित्सकांना
सरकारी नोकयांत समाविष्ट
करावे. त्यांनतर १९४८मध्ये
दुसया कमिटीने अहवाल सादर केला त्यातील सुचना(१)आयुर्वेद व अॅलोपॅथी या दोन्ही शास्त्रांचा
समन्वय करणे आवश्यक आहे. यासाठी
समन्वित पाठ्यक्रम तयार करावा.(२)एकाच अध्यापकाने
दोन्हा शास्त्रांचे विषय शिकवावेत. संपुर्ण
भारतामध्ये एकच अभ्यासक्रम
असावा.(३)सर्व शिक्षणकेद्रांमध्ये संशोधनाची
सोय करावी. परंतू सरकारने या सूचना न स्विकारता पुढील निर्णय जाहीर केले. (१)आयुर्वेद
व अॅलोपॅथी या दोन्ही शास्त्रांचा
समन्वय करणे अव्यवहार्य
आहे. (२) अॅलोपॅथीवर
आधारीत स्वास्थ योजना केंद्र सरकार तयार करणार.(३)आयुर्वेदाचे संशोधन
करण्यात यावे. त्यानुसार
१९५२ मध्ये जामनगर
येथ आयुर्वेदाचे केंद्रिय
संशोधन केंद्र स्थापन
झाले. पुढे गुलाबकुंवरबा
आयुर्वेद इन्स्टिट्यूशन, जामनगर
येथे १९५६ मध्ये केंद्र सरकारने
प्रथम पदव्यत्तर शिक्षणकेंद्र
सुरू केले. व नंतर अनेक ठीकाणी बॅचलर ऑफ आयुर्वेदीक
मेडिसीन अँड सर्जरी
असा मिश्र शैक्षणिक
अभ्यासक्रम सुरू झाला. परंतू या पदवीधरांना शासनाकडून
एम.बी.बी.एस. शी समकक्ष
असा समान दर्जा व समान वेतन मिळत नव्हते म्हणून
१९७० मध्ये या असंतुष्टांनी संप केला, दरम्यान
संपुर्ण भारतात फक्त आयुर्वेदाचा एकच अभ्यासक्रम सुरू करण्यात यावा यासाठी केंद्र
शासनाने सेंट्रल कौन्सिल
ऑफ इंडियन मेडिसीन
ही संस्था स्थापन
केली आणि मिश्र अभ्यासक्रम बंद केला. १९७१ पासून सर्वत्र
फक्त आयुर्वेदाचा एकच अभ्यासक्रम सुरू करण्यात आला. सध्या याच अभ्यासक्रमानुसार सर्व विद्यापिठांमध्ये आयुर्वेदाचे
पदवी शिक्षण सुरू आहे. पाश्चात्य
राष्ट्रांचे ज्यावेळी आयुर्वेदाकडे
लक्ष वेधले गेले आणि जागतिक
आरोग्य संघटनेनेही जेव्हा
आयुर्वेदाला मान्यता दिली त्यानंतर सरकारकडून
आयुर्वेदाला विशेष प्रोत्साहन
मिळू लागले. अनेक जुनाट स्वरूपाच्या
किंवा पाश्चात्य चिकीत्सेने
दुःसाह्य ठरलेल्या रोगांवर
आयुर्वेद चिकीत्सेने उत्तम गुण येतो तसेच या औषधांचा दुष्परिणाम
नसतो या गोष्टींमुळे
आयुर्वेदाचे महत्व वाढू लागले आहे. पाश्चात्य देशांमध्ये
सुध्दा आयुर्वेदाचा प्रसार
झपाट्याने होऊ लागला आहे. पश्चिम
जर्मनीतील झारब्रुकेन येथील नॅचरोपॅथीच्या कॉलेजमध्ये
१९८० पासून आयुर्वेदाचे
शिक्षण देण्याचे कार्य चालू आहे. तसेच पश्चिम
जर्मनीतील म्यनिच येथील संस्थेमध्ये १९८६ पासून आयुर्वेदाचे
शिक्षण चालू आहे. तर उत्तर जर्मनीतील हानेमान
कॉलिगियुम येथे १९८५ पासून आयुर्वेदाचे
शिक्षण चालू आहे. ब्रेमेन विद्यापिठामध्ये १९८३ पासून आयुर्वेदाचे
शिक्षण चालू आहे. इटलीमध्ये व्हिला
अेरा येथे १९८६ पासून आयुर्वेदाचे
शिक्षण चालू आहे. स्पेनमध्ये माद्रिद
येथे १९८५ पासून आयुर्वेदाचे शिक्षण
चालू आहे. अमेरिकेतील
सॅटाफे येथे १९८० पासून आयुर्वेदाचे
शिक्षण चालू आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्निया
विद्यापिठामध्ये १९९० पासून आयुर्वेदाचे शिक्षण
चालू आहे. १९७८ पासून जपानमध्ये
रिसर्च सोसायटी ऑफ आयुर्वेद इन जपान या संस्थेचे आयुर्वेदाच्या
प्रसाराचे कार्य चालू असून त्या संस्थेतर्फे सुश्रुत
संहितेचे जपानी भाषांतर
करण्यात आलेले आहे. इराणमधील इसफाहेन
विद्यापिठामध्ये १९८५ पासून आयुर्वेदाचे शिक्षण
चालू आहे. आयुर्वेदाचा
प्रसार करण्यासाठी महाराष्टातून
पुढील नियतकालिके प्रसिध्द
होत आहेत. (१)आयुर्विद्या--१९३७ पासून राष्टीय शिक्षण
मंडळ, पुणे यांनी चालविलेल्या मासिकास
आयुर्वेद रसशाळा व टिळक आयुर्वेद
महाविद्यालयाचे सहकार्य लाभलेले
आहे. (२)आयुर्वेद पत्रिका--नाशिक येथून दर महिन्यास
प्रसिध्द होऊन त्याचे
अनेक विशेषांक प्रसिध्द
झाल्याने लोकप्रिय आहे. (३)दीर्घायु--केवळ आयुर्वेद
व आरोग्य या विषयां साठी पुण्यातून प्रसिध्द
होणारा हा एकमेव दिवाळी अंक आहे. (४)मधुजीवन--दर दोन महिन्यांनी मुंबईतून
प्रसिध्द होतो.(५)जीवक सोलापूर
येथून दर महिन्यास
प्रसिध्द होते. तसेच प्रांतातून प्रसिध्द
होणारी मासिके (१)धन्वन्तरी--अलिगड येथून हिदी भाषेमध्येे,
(२)सचित्र आयुर्वेद--कलकता येथून हिदी व इंग्रजी भाषेमध्येे,
(३)नागार्जुन--कलकत्ता येथून इंग्रजी
भाषेमध्येे, (४)आयुर्वेद अनुसंधान
पत्रिका--काशी येथून हिदी व इंग्रजी
भाषेमध्येे, (५)चरक--अहमदाबाद येथून गुजराथी भाषेमध्येे,
(६)सुश्रुत--बडोदा येथून गुजराथी
भाषेमध्येे, (७) द जर्नल ऑफ रीसर्च अँड एज्युकेशन इन इंडियन मडिसिन--वाराणसी येथून इंग्रजी भाषेमध्येे,
(८)अन्शिअंट सायन्स ऑफ लाईफ--कोईबतूर येथून इंग्रजी भाषेमध्येे,
(९)आयुर्वेद विशेषज्ञ--दिल्ली येथून हिदी भाषेमध्येे
प्रकाशित होत आहे. चरक व सुश्रुत या आयुर्वेदाच्या आद्यमहर्षींच्या काळापासूनच
आयुर्वेदाचे संशोधन सातत्याने
चालू आहे. अलिकडच्या
काळामध्ये आयुर्वेदातील वनस्पती
औषधींवर आधुनिक पध्दतीनुसार
अनेक औषधी कंपन्या,
मेडिकल कॉलेजातील फार्माकोलॉजी
विभाग, रसायनशास्त्र विभाग यांनी बरेच संशोधन करून अनेक चांगली
तत्त्वे, सिध्दांत शोधून काढले आहेत. आयुर्वेदाच्या संशोधनामध्ये
कलकत्याच्या ट्रापीकल स्कूल ऑफ मेडीसिन
या संस्थेने अतिशय महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. १९६३ मध्ये काशी हिंदू विश्वविद्यालय येथे पदव्यत्तर संस्थान
स्थापन झाले. त्यात पदव्यत्तर अभ्यास
व आयुर्वेदीय अनुसंधान
सुरू झाले. पुढे १९६५ मध्ये आयुर्वेदीक द्रव्यांचे
उपयोग अनेक निरनिराळ्या
रूग्णांवर करून पहाण्याची
संशोधन केंद्रे सुरू झाली. कांपोझिट
ड्रग रीसर्च स्कीम यामध्ये पुणे, मुंबई, सुरत, त्रिवेंद्रम, पाटणा,
बनारस, पतियाळा, ग्वाल्हेर,
दिल्ली, आणि अलिगढ अशी दहा केंद्रे सुरू झाली. यामध्ये
वनस्पतींचे विशीष्ट व्याधींवर
कार्य कसे होते याचे सुक्ष्म
निरीक्षण होत असे. १.४.१९७० पासून सेंट्रल कौन्सिल
फॉर रीसर्च इन इंडियन मेडिसिन
अँड होमिओपॅथी या परिषदेची कायदेशीररीत्या स्थापना
झाली. त्याचे पुढील प्रमाणे कार्य चालू आहे--(१)आयुर्वेदीक द्रव्यांचे
निश्चितीकरण, (२)आयुर्वेदीय वनस्पतींची
लागवड करून औषधी द्रव्ये तयार करणे, (३)खेडोपाडी
जाऊन औषधांची माहिती
मिळविणे व तेथील रूग्णांवर उपचार करणे, (४)कुटूंबनियोजनासाठी औषधी द्रव्ये शोघून काढणे, (५)मूलभूत
सिध्दांत संशोधनाद्वारे पडताळून
पहाणे. १९७८ पासून या परिषदेचे
चार स्वतंत्र विभाग करण्यात आले. भारतातील ट्रॅडिशनल
सिस्टिम ऑफ मेडिसिन
यामध्ये आयुर्वेद, सिध्द,
युनानी, योग, व नॅचरोपॅथी या चिकित्सापध्दतींचा समावेश
होतो. आणि या सर्वांना केंद्र
शासनाने मान्यता दिलेली
आहे. भारतातील आयुर्वेदाच्या
संघटना पुढील प्रमाणे
कार्य करीत आहेत (१)नॅशनल इंटिग्रेटेड
मेडिकल असोसिएशन--प्रमुख वैशिष्ये--प्राचीन भारतीय
वैद्यक व अर्वाचीन
वैद्यक यांचा समन्वय
घडवून आणणे, आयुर्वेदाचे
ज्ञान समृध्द करणे, सर्व पदवीधर
वैद्यकीय व्यवसायिकांमध्ये समानता
आणण्यसाठी प्रयत्न करणे, इत्यादी. (२)ऑल इडिया आयुर्वेदिक
स्पेशालिस्टस् पोस्ट ग्रॅज्युएट
असोसिएशन-- प्रमुख वैशिष्ये--आयुर्वेदामध्ये विशेषज्ञता
प्राप्त करणे, आयुर्वेदाचा
विद्यार्थी, शिक्षक, वैद्य,
यांचे संघटन करून त्याचे आयुर्वेदाचे
ज्ञान वाढविण्यासाठी प्रयत्न
करणे, सेवानिवृत्त व वयोवृध्द तज्ञांचा
सहयोग घेऊन त्याच्या
मार्गदर्शनाखाली आयुर्वेदाची लोकप्रियता
वाढविणे, आयुर्वेदाच्या माहीतीचे
नियतकालीके छापून त्याची
प्रसिध्दी करणे, आयुर्वेदाच्या
पुस्तके छापण्यासाठी प्रयत्न
करणे, परिसंवाद, चर्चा आयोजित करून आयुर्वेदाची जनजागृती
करणे (३)इंडियन असोसिएशन
फॉर द स्टडी ऑफ ट्रॅडिशनल
एशियन मेडिसिन--प्रमुख वैशिष्ये--आयुर्वेदाच्या शिक्षण,
संशोधन, पुस्तक प्रकाशन
यासाठी आर्थिक सहाय्य
करणे, सरकारी व बीनसरकारी संस्थांमधून
आर्थिक सहाय्य मिळविणे,
आंतरराष्ट्रीय संघटनांशी संपर्क
करून त्याच्याशी संलग्न
राहून आयुर्वेदाचा प्रसार
जगभर करणे (४)अखिल
भारतीय आयुर्वेद महासंमेलन--प्रमुख वैशिष्ये--आयुर्वेदावरील आक्षेपांचे
निराकरण करणे, आयुर्वेदाचे
संरक्षण घडवून त्याचा
विकास साधणे,आयुर्वेदीय पध्दतीने
भारतीय जनतेला निरोगी
आणि सुखी बनवून भारत राष्ट्र
बलवान, सुदृढ व समृध्द बनविणे,
भारतीय जनतेला आत्मकल्याणाचा
मार्ग दाखविणे, इत्यादी.
तसेच परदेशातील संघटनांची
नावे खालील प्रमाणे
आहेत. (१)क्रड्ढद्धथ्र्ठ्ठद ऋथ्र्ड्ढद्धत्ड़ठ्ठद ऋड़ठ्ठड्डड्ढथ्र्न्र्, (२)क्ष्दद्यड्ढद्धदठ्ठद्यत्दृदठ्ठथ् ऋद्मद्मदृड़त्ठ्ठद्यत्दृद ढदृद्ध
ऋन्र्द्वद्धध्ड्ढड्डठ्ठ ठ्ठदड्ड ग़्ठ्ठद्यद्वद्धदृद्रठ्ठद्यण्न्र्, (३)क्ष्दद्यड्ढद्धदठ्ठद्यत्दृदठ्ठथ् क़ड्ढड्डड्ढद्धठ्ठद्यत्दृद दृढ क्तड्ढत्थ्द्धठ्ठद्यत्त्त्ड्ढद्धद्म ऋद्मद्मदृड़त्ठ्ठद्यत्दृद, (४)ङड्ढद्मड्ढठ्ठद्धड़ण् च्दृड़त्ड्ढद्यन्र् ढदृद्ध
ऋन्र्द्वद्धध्ड्ढड्डठ्ठ त्द ख्ठ्ठद्रठ्ठद,
अशा प्रकारे आयुर्वेदाची
वाटचाल चाललेली आहे. आयुर्वेदाचा अभ्यास
करताना त्याचा इतिहास
पहाणे आवश्यक आहे कारण त्यामुळे
आयुर्वेदाचा उगम कोठून झाला त्यानंतर
आयुर्वेदातील चढउतार कसे झाले कोण-कोणत्या
ग्रंथांची निर्मिती झाली याचा अंदाज येऊ शकतो.
अष्टांग
आयुर्वेद--आयुर्वेद हे मनुष्याच्या आयुष्याचे
अलौकीक शास्त्र आहे. मनुष्याच्या शरीराचा
व सृष्टीचा संपूर्ण
अभ्यास करून अतिप्राचीन
काळापासून हे शास्त्र
प्रगत झालेले आहे. आयुर्वेदाच्या चरकसंहिता,
सुश्रुतसंहिता व अष्टांगसंग्रह
या तीन महत्वपुर्ण
ग्रंथांपैकी अष्टांगसंग्रह हा ग्रंथ प्रथम वाग्भटाने अंदाजे
दुसया शतकामध्ये रचलेला आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य
असे आहे की, चरकसंहिता मुख्यत्वेकरून
कायचिकित्सेसाठी प्रसिध्द आहे. तर सुश्रुतसंहिता
शल्यचिकित्साप्रधान आहे. परंतू अष्टांगसंग्रहात आयुर्वेदाच्या
सर्व आठही पध्दतींचे
एकत्रित विवेचन केलेले
आहे. त्यामुळे या एकाच ग्रंथाचा
अभ्यास केला तरी आयुर्वेदाचे ज्ञान मिळू शकते. अष्टांगसंग्रहात एकूण १५० अध्याय
असून त्यामध्ये सूत्रस्थान,
शारीरस्थान, निदानस्थान, चिकित्सास्थान, कल्पस्थान,
व उत्तरस्थान अश्या एकूण सहा प्रकरणांमध्ये स्वस्थवृत्त,
द्रव्यगुण, दोषधातुमलविज्ञान, रोगविज्ञान,
चिकित्सा-तत्त्वज्ञान, पंचकर्म, शरिरविज्ञान,
अरिष्टविज्ञान, रोगनिदान, कायचिकित्सा,
पंचकर्मांचे कल्प, कौमारभृत्य,
भूतविद्या, मानसरोग, शालाक्य,
शल्य, क्षुद्ररोग, गुह्यरोग,
अगदतंत्र, रसायन वाजीकरण,
इत्यादी विषयांचे मौलीक विचार स्पष्ट
केले आहेत. या अष्टांगसंग्रहाची इंदू टीका प्रसिध्द
असून त्याचे मराठी भाषांतर १९७५ साली प्रसिध्द
होऊन त्यास महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठांनी बी.ए.एम.एस.
अभ्यासक्रमासाठी संदर्भग्रंथ म्हणून
मान्यता दिलेली आहे.
अंदाजे सहाव्या शतकामध्ये
दुसया वाग्भटाने १२० अध्यायांचा अष्टांगहृदय
नावाचा ग्रंथ रचलेला
आहे. या ग्रंथाची
रचना करताना सूत्रे
पाठ करता येतील अशी सोपी रचना केलेली
आहे. न अति संक्षेप न अति विस्तार
या धर्तीवर या ग्रंथाची रचना केली असल्याने
याचा सर्वत्र झपाट्याने
प्रसार झाला. थोडक्यात
अष्टांगसंग्रहातील पुषकळसे अनावश्यक
विषय वगळून एक उत्तम लोकोपयोगी
असा अष्टांगहृदय नावाचा
ग्रंथ तयार केला. यामुळेच या लोकप्रिय अष्टांगहृदयाच्या असंख्य
टीका नंतरच्या काळामध्ये
प्रसिध्द झाल्या. त्यामध्ये
अरूणदत्त व हेमाद्रि
या प्रामुख्याने सांगता
येतील. इतकेच नव्हे तर परदेशी
भाषांमध्ये सुध्दा याचे अनुवाद झालेले
आहेत. उदा. अष्टांकर--अरबी अनुवाद,
वैडूर्यभाष्य--तिबेटी अनुवाद, तर १९४१ मध्ये जर्मन अनुवाद
प्रसिध्द झालेला आहे. आयुर्वेदामध्ये रोगांचे
प्रकार व उपचार पध्दती यांच्यानुसार
प्रमुख आठ प्रकार
आहेत, तेच अष्टांग
आयुर्वेद म्हणून प्रसिध्द
आहे. शल्यतंत्र, शालाक्यतंत्र,
कौमारभृत्यतंत्र, कायचिकित्सा, अगदतंत्र,
ग्रहचिकित्सा, रसायनतंत्र, व वाजीकरणतंत्र ही आयुर्वेदाची आठ अंगे आहेत.
१.शल्यतंत्र--शरीराला पीडा देणाया कोणत्याही
वस्तुला शल्य असे म्हणतात. युध्दाच्या
वेळी शरीरात बाणांची
किंवा तलवारीची टोके घूसून शरीराला
पीडा होत असे म्हणून त्याला
शल्य म्हणतात. शरीरात
घुसलेल्या वस्तु बाहेर काढून टाकणे,
जखम भरून आणणे व त्यामुळे
झालेल्या व्रणांची व त्या अनुषंगिक
इतर व्याधींची योग्य चिकित्सा करणाया
शास्त्राला शल्यतंत्र असे म्हणतात. सुश्रुताने
शल्याचे अनेक प्रकार
स्पष्ट केले आहेत. उदा. गवत, काडी, दगड, लोखंड, अस्थी,
नख इत्यादी हे सर्व आंगतुशल्याचेे
प्रकार आहेत. ऋग्वेदात
सुध्दा शल्यतंत्राचे स्पष्ट
उल्लेख आहेत, म्हणून
शल्यतंत्राची उत्पत्ती ऋग्वेदकालापासून मानावी
लागते. त्यानंतरच्या काळामध्ये
शल्यतंत्राची प्रगती झालेली
नाही. इतकेच नव्हेतर
जवळजवळ या शल्यतंत्राचा
पुर्ण हास झाला. आजच्या काळामध्ये
शल्यतंत्रातील मूलभूत सिध्दांत
नीट समजावून घेऊन त्यानुसार नवीन शस्त्रकर्माच्या पध्दतींचे
संशोधन करणे अत्यंत
आवश्यक आहे. त्यासाठी
आजच्या काळातील काही साहित्य उपयोगी
आहे. उदा. शल्यतंत्र
समुच्चय--पं. वामदेव मिश्र(पटना),
सौश्रुती--रमानाथ द्विवेदी, शल्य समन्वय--अनंतराम शर्मा(हरिद्वार), संक्षिप्त
शल्य विज्ञान--डॉ. मुकुंद
वर्मा(वाराणसी), शल्यप्रदीपिका--मुकुंद वर्मा(वाराणसी), सर्जिकल
अेथिक्स इन आयुर्वेदा--शर्मा गौड, शल्यचिकित्सा के वरदान--आत्मप्रकाश शहा, शल्यतंत्रमे रोगी परिक्षा--डॉ.देशपांडे, भग्नचिकित्सा--डॉ.ब्रजनंदन शर्मा,
आधुनिक शल्यचिकित्सा के सिध्दांत--डॉ. उडुपा,
दृष्टांतशल्यतंत्र--वैद्य आठवले, इत्यादी
साहित्य आज उपलब्ध
असून काही प्रमाणात
शस्त्रकर्माच्या पध्दतींचे संशोधन
चालू आहे. २.शालाक्यतंत्र--शलाका म्हणजे
बारीक लांब सळई अथवा या आकाराची यंत्रे,
याच्या साहाय्याने ऊर्ध्वजंत्रुगत म्हणजे
तोंड, गळा, कान, नाक या अवयवांचे परिक्षण
व चिकित्सा केली जाते म्हणून
त्याला शालाक्यतंत्र म्हणतात
असे सुश्रुत संहितेमध्ये
सांगितले आहे. या शालाक्यतंत्राच्या अनेक संहितांचा उल्लेख
निरनिराळ्या शास्त्रपुराणांमध्ये दिसून येतो परंतू यापैकी पूर्णांशाने
एकही संहिता आज उपलब्ध नसल्याने
शालाक्यतंत्राचे मौलीक ज्ञान नष्ट झालेले
आहे. तरी या शालाक्यतंत्राचे संशोधन
करण्यासाठी आजच्या काळातील
काही साहित्य उपयोगी
आहे. उदा. नेत्ररोगविज्ञान--वैद्य भावे, नेत्ररोगविज्ञान--वैद्य पद्मवार,
शल्यतंत्रत्--वैद्य ठाकूर, शालाक्यतंत्र--रमानाथ द्विवेदी,
इत्यादी.
३.कौमारभृत्यतंत्र--या आयुर्वेदाच्या
शाखेमध्ये प्रामुख्याने लहान मुलांचा विचार केलेला आहे. लहान मुलांचे
पोषण, त्यांची व्यवस्था,
त्यांचे आजार त्यावर
उपचार यांची माहीती
सुश्रुत संहितेमध्ये विस्ताराने
सांगितलेली आहे. केवळ दुध पिणारे,
दूध व अन्न खाणारे आणि केवळ अन्न खाणारे बालक अश्या तीन प्रकाराने लहान मुलांचे वर्गीकरण
करून प्रत्येक अवस्थेमध्ये
कोणकोणते रोग होऊ शकतात त्यावर
कोणते उपचार करावेत
अशी संपूर्ण माहीती
यामध्ये दिलेली आहे. या कौमारभृत्यतंत्राच्या आठ संहिता निर्माण
झाल्याचा उल्लेख शास्त्रपुराणांमध्ये दिसून येतो परंतू यापैकी फक्त काश्यपसंहिता आज सुध्दा उपलब्ध
आहे. तरी या कौमारभृत्यतंत्राचा अभ्यास
करण्यासाठी आजच्या काळातील
काही साहित्य उपयोगी
आहे. उदा. कौमारभृत्यतंत्र--वैद्य निर्मला
राजवाडे, गायनॉलॉजिकल कॉन्सेप्टस्
इन आयुर्वेदा--डॉ.निर्मला जोशी, कौमारभृत्यतंत्र--रघुवीर त्रिवेदी,
अभिनव कौमारभृत्य--राधाकृष्णनाथ, इत्यादी.
४. कायचिकित्सा--संपूर्ण शरीरामध्ये
होणारे ज्वर, रक्तपित्तदोष,
उन्माद, अपस्मार, कुष्ठ,
अतिसार इ. रोगांची
चिकित्सा केली जाते म्हणून त्याला
कायचिकित्सा म्हणतात. काय याचा अर्थ संपुर्ण शरीर, म्हणून संपुर्ण
शरीरगत रोगांच्या चिकित्सेला
कायचिकित्सा म्हणतात. मनुष्याच्या
शरीरातील जठाराग्नी अन्नपचनाचे
कार्य करून शरीराचे
पोषण करतो. हा जठाराग्नी कार्यक्षम
ठेवण्यासाठी जी चिकित्सा
केली जाते तीला कायचिकित्सा म्हणतात.रोग
नष्ट करण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला
चिकित्सा म्हणतात. आयुर्वेदामध्ये शरीराचे
स्वास्थ व व्याधी
या दोघांचाही विचार केलेला आहे. वैद्य, औषध, रोगी व परिचारक या चार गोष्टी
उत्तम चिकित्सेचे आधारस्तंभ
आहेत या चारही गोष्टी सर्वगुणसंपन्न
असल्या तर चिकित्सा
उत्तम व यशस्वी
होते. शरीरातील दोष आधिक प्रमाणात
असतील तर ते शरीराबाहेर काढून टाकण्यासाठी उपाय करावे लागतात,
त्याला पंचकर्म चिकित्सा
असे म्हणतात. तसेच शरीरातील दोष कमी प्रमाणात
असतील, किंवा पंचकर्म
चिकित्सा करणे अशक्य असेल तेव्हा
निरनिराळ्या उपचारांचा वापर करून दोष बाहेर न काढता दोषांचे
साम्य निर्माण केले जाते त्याला
शमनचिकित्सा असे म्हणतात.
पंचकर्म ही आयुर्वेदातील
एक वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा
आहे. वमन, विरेचन,
बस्ती, नस्य, व रक्तमोक्ष हे पंचकर्म चिकित्सेतील
उपक्रम आहेत. या उपक्रमापुर्वी स्नेहन
व स्वेदन असे दोन उपक्रम
करावे लागतात. त्याला
पुर्वकर्म म्हणतात. स्नेहन
म्हणजे तूप, तेल इत्यादी स्निग्ध
पदार्थ पोटातून घेण्यास
व बाहेरून अंगाला
चोळून अशा दोन प्रकारांनी स्निग्ध
पदार्थांचे सेवन करणे. स्नेहना मुळे दोष धातूंना
चिकटून बसलेले असतात ते सुटे होतात. स्वेदन
म्हणजे शरीराला खूप घाम येण्यासाठी
करावयाचे उपचार होय. स्वेदनाच्या उष्णतेमुळे
दोषांचे विलयन होऊन ते पातळ होतात व शरीरातून बाहेर काढण्यास सोपे होतात. वमन म्हणजे उलटी घडवून आणण्याचा
उपचार. मिठाचे पाणी, उसाचा रस, त्रिफळाचा काढा वगैरे पेये भरपूर प्रमाणात
पिण्यास देऊन नंतर गेळफळाचे चूर्ण देतात. त्याने
उलटी होऊन जठर व लहान आतड्यातील कफ व पित्तदोष
निघून जातात. मुख्यतः
कफप्रधान विकारात हा उपाय केला जातो. विरेचन
म्हणजे जुलाब होण्यासाठी
करावयाचा उपचार. एरंडेल
तेल, कुटकी, निशोत्तर
वगैरे जुलाब होणारी
औषधे देऊन आतड्यातील
पित्त, कफ निघून जातात. मुख्यतः
पित्तप्रधान विकारात हा उपाय केला जातो. बस्ती म्हणजे गुदद्वारामधून
औषधाचे काढे, तेल वगैरे शरीरात
सोडतात नंतर काङी काळ मोठ्या
आतड्यामध्ये ही द्रव्ये
राहू दिल्यानंतर दोषाबरोबर
शरीराच्या बाहेर पडतात.
मुख्यतः वातप्रधान विकारात
हा उपाय केला जातो. नस्य म्हणजे कपाळ, मस्तक, नाक, कान, घसा वगैरे उर्ध्वजत्रुगत
म्हणजे मानेच्या वरील भागामधील विकारात
नाकामध्ये औषध टाकून दोष बाहेर काढण्याचा उपाय. व रक्तमोक्ष
म्हणजे अशुध्द रक्तवाहीन्यामधून रक्त काढून टाकणे किंवा जळवा लावून रक्त काढणे होय. रक्तदोषांमुळे होणारे
विकार व रक्तात
पित्त मिसळल्यामुळे उद्भवणारे
डोकेदुखी, चक्कर या विकारांसाठी हा उपचार कतात. शमन चिकित्सा
सात प्रकारची आहे. दीपन म्हणजे
जठराग्नीची शक्ती वाढविणारी
औषधे देणे, पाचन म्हणजे अन्न व आमदोष यांचे पचन करणारी औषधे देणे, क्षुधानिग्रह
म्हणजे आहार कमी करणे किंवा लंघन करणे. तृष्णानिग्रह म्हणजे
तहान लागली तरी पाणी न पिणे. व्यायाम
म्हणजे श्रमाची कामे, हिंडणे किंवा योगासने जोर, बैठका यासारखा
व्यायाम करणे. आतपसेवा
म्हणजे सूर्याच्या उष्णतेचा
चिकित्सेसाठी उपयोग करून घेणे. वायुनिग्रह
म्हणजे प्राणायाम करून वायुचा निग्रह
करणे. अश्याप्रकारे या सात शमन उपायांनी दोषांचे
वैषम्य नष्ट केले जाते. तरी या कायचिकित्सेचा
अभ्यास करण्यासाठी आजच्या
काळातील भरपूर साहित्य
उपयोगी आहे. उदा. चिकित्सादर्श--पं. राणेश्वरदत्त
शास्त्री, कायचिकित्सा--पं. रामरक्ष
पाठक, कायचिकित्सा--पं. गंगा सहाय पांडेय,
चिकित्साप्रदीप--वैद्य भा.वि.गोखले, पंचकर्म
विज्ञान--वैद्य श्रीधर कस्तुरे,
पंचकर्म विज्ञान--वैद्य य.गो. जोशी, व्याधी
विनिश्चय--वैद्य अ.दा. आठवले,
इंट्रोडक्शन टू कायचिकित्सा
डायजेशन अँड मेटॅबॉलीझम
इन आयुरवेदा--डॉ. द्वारकानाथ,
भिषक् कर्मसिध्दी--पं.रमानाथ द्विवेदी,
इत्यादी. ५. अगदतंत्र--शरीरात शिरलेले
विष नष्ट करण्यासाठी
जी चिकित्सा केली जाते त्याला
अगदतंत्र हे नाव सुश्रुुताने दिलेले
आहे. साप, विवीध विषारी प्राणी,
कीटक इत्यादी चावल्याने
किंवा त्यांच्या संपकर्ाने
मनुष्य विषग्रस्त झाल्यास
त्यावर केली जाणाया
चिकित्सेला अगदतंत्र म्हणतात.
अथर्ववेदामध्ये निरनिराळ्या विषांनी
विविध रोग उत्पन्न
होतात म्हणूनच निर्विषीकरणासाठी अथर्ववेदामध्ये अनेक मंत्र उल्लेखित
केलेले आहेत. अथर्ववेदातील
श्रौतसूत्र व कौशिकसूत्र
यामध्ये अगदतंत्राची भरपूर माहिती आहे. महाभारत व ब्रह्मवैवर्त पुराणांमध्येही अगदतंत्राचा
उपयोग केल्याचे अनेक उल्लेख आहेत. विष अत्यंत
आशुकारी असल्याने त्याची
चिकित्सा करताना ती त्वरेने करावी लागते हे लक्षात घेऊन अष्टांगसंग्रहाने उत्तरस्थानामध्ये अगदतंत्रासंबंधी अनेक कल्प व चिकित्सा उपक्रम
सांगितलेले आहेत. वाग्भटाने
याच प्रकरणामध्ये नग्नजित,
विदेहपति, आलंवायन, धन्वन्तरी,
कौटिल्य, उशना, काश्यप,
शंकर, अस्थिक या अगदतंत्रासंबंधी तज्ञ आचार्यांचा उल्लेख
केलेला आहे. तरी या अगदतंत्राचा
अभ्यास करण्यासाठी आजच्या
काळातील थोडेच साहित्य
उपयोगी आहे. उदा. व्यवहार आयुर्वेद
व अगदतंत्र--सुभाष रानडे,
विषतंत्र--म.पा.पलंगे. इत्यादी.
६.ग्रहचिकित्सा--विवीध क्रोधीत
देवता, भूत, पिशाच्च
इत्यादींच्या आक्रमणाने पिडीत व्यक्तीचे कष्ट अथवा त्यांना
झालेले व्याधी दूर करण्यासाठी जी चिकित्सा केली जाते त्याला
ग्रहचिकित्सा असे नांव अष्टांगसंग्रहाने दिलेले
आहे. सुश्रुताने या चिकित्सेला भूतविद्या
असे म्हटले आहे. आयुर्वेदामध्ये भूतोन्माद,
अमानुष उपसर्ग व बालग्रहांचे विस्तारपुर्वक
केले आहे. या सर्वांचा समावेश
भूतविद्या किंवा ग्रहचिकित्सा
यामध्ये होतो. आयुर्वेदाने
भूतविद्या किंवा ग्रहचिकित्सेला मानसविकार
या दृष्टीकोनातून समजून घेतले आहे. आणि म्हणूनच
मनाचा सत्त्वगुण वाढविण्यासाठी
यामध्ये प्राधान्याने प्रयत्न
केले जातात. चरकाने
उपयाभिप्लुता चिकित्सा अशा प्रकारे या चिकित्सेचे वर्णन केले आहे. तरी या ग्रहचिकित्सेचा अभ्यास
करण्यासाठी आजच्या काळात भूतविद्या नावाचा
एकमेव ग्रंथ उपलब्ध
आहे. त्यामध्ये भूत, पिशाच्च यांची वर्णने व त्याच्या निराकरणाचे
अनेक उपाय वर्णन केले आहेत. उदा. मणिधारण,
मंत्रविधी, वनस्पतींचे रक्षोघ्नप्रयोग, पृश्निपर्णी,
कुष्ठ, अपामार्ग, जंगिड,
आंजनमणि यांची माहीती
दिलेली आहे. ७. रसायनतंत्र--तारूण्यावस्था दीर्घकाळ
टिकविण्यासाठी तसेच आयुष्य
व बल यांची वृध्दी करण्यासाठी
आणि शरीराची रोगप्रतिकारक
शक्ती वाढविण्यासाठी जी चिकित्सा केली जाते त्याला
रसायनतंत्र म्हणतात. निरनिराळी
औषधे, आहार व विहार या तीनही प्रकारांनी
रसायन चिकित्सा करता येते. या चिकित्सेने शरीरातील
रसरक्तादी धातूंची उत्तम निर्मिती होते. रसायन चिकित्सेने
मनुष्याचे म्हातारपण व म्ह्ातारपणामध्ये उद्भवणारे
रोग नष्ट करता येतात. तरी या ग्रहचिकित्सेचा अभ्यास
करण्यासाठी आजच्या काळातील
काहीही साहित्य उपलब्ध
नाहीे. परंतू अष्टांगसंग्रहातील रसायन प्रकरणामध्ये भल्लातक,
पिप्पली, लसु, शिलाजतु,
स्वर्णमाक्षिक या औषधांचे
शास्त्रीय वर्णन संशोधनाच्या
दृष्टीने महत्त्वाचे आहे. आश्विनी कुमारांनी
वदन, वृध्दकली, च्यवनऋषी,
कक्षीवान या वृध्दांना
पुन्हा तारूण्या प्राप्त
करून दिले असा उल्लेख ऋग्वेदामध्ये
दिसतो. अष्टांगहृदयातील उत्तरस्थान
प्रकरणामध्ये या रसायन चिकित्सेची बरीच माहीती संदर्भासाठी
अतिशय उपयुक्त आहे. ८. वाजीकरणतंत्र--मैथुनशक्ती वाढविण्यासाठी
आणि वीर्यवृध्दी करण्यासाठी
ज्या चिकित्सेचा उपयोग केल जातो त्याला वाजीकरणतंत्र
म्हणतात. ज्यांचे वीर्य दूषीत झालेले
असते अथवा जे क्षीणवीर्य असतात त्यांनाही या चिकित्सेने फायदा मिळतो. आश्विनी
कुमारांनी वध्रिमती नावाच्या
स्त्रीचे वंध्यत्व घालवून
तिला पुत्रप्रप्ती होईल अशी चिकित्सा
केली असा उल्लेख
ऋग्वेदामध्ये दिसतो. या विषयासंबंधी प्राचीनकाळातील कुचुमारतंत्र,
अनंगरंग व पंचसायक
असे ग्रंथ आहेत. प्रामुख्याने शुक्रवर्धक
आहार-विहार याचा विचार या वाजीकरणतंत्रामध्ये केला जातो. स्निग्ध
व गोड पदार्थ
उत्तम शुक्रवर्धक आहेत म्हणून लग्नामध्ये,
केळवणामध्ये गोड पदार्थांचा
वापर करण्याची पध्दत रूढ झालेली
आहे. अश्वगंधा, शतावरी,
तालीमखाना, कवचबीज अशी नानाविध औषधे या वाजीकरणतंत्रामध्ये समाविष्ट
आहेत.
No comments:
Post a Comment