Saturday, 13 June 2020

युगपुरूष श्रीकृष्ण


युगपुरूष  श्रीकृष्ण
श्रीकृष्णासारखा  सर्वतोपरी  अद्वितीय  पुरूष  पृथ्वीतलावर  आजवर  झालेला  नाही.  अलौकिक  पराक्रम,  असामान्य  स्वार्थत्याग  अणि  द्रष्टा  तत्त्वज्ञानी  इत्यादी  सद्गुणांनी  श्रीकृष्ण  युगपुरूष  म्हणून  सर्वांना  परिचित  आहे.  अलिकडच्या  काळातील  नेपोलियनचा  पराक्रम,  वॉशिंग्टनचा  स्वार्थत्याग,  ग्लाडस्टन,  विस्मार्क  या  विचारवंतांचा  मुत्सद्दीपणा  हे  सर्व  सद्गुण  श्रीकृष्णामध्ये  एकवटलेले  होते.  तसेच  परमार्थामध्ये,  धर्मस्थापनेमध्ये  श्रीकृष्णाचे  कार्य  अलौकीक  आहे.  अग्रणी  महंमदाने  निश्चयाच्या  जोरावर,  तर  ख्रिस्ताने  सौजन्याच्या  जोरावर,  तर  बुध्दाने  बुध्दिवादाच्या  जोरावर  आपापल्या  धर्माचा  प्रसार  केला.  परंतू  श्रीकृष्णामध्ये  निश्चय,  सौजन्य,  तसेच  बुध्दिवाद  हे  तिन्ही  सद्गुण  एकाच  ठिकाणी  असल्यामुळे  त्याने  केलेल्या  धर्माचा  प्रसार  युगानूयुगे  अबाधित  टिकून  राहिला  आहे.  श्रीकृष्णाने  आपल्या  ज्ञानोपदेशामुळे  भरतखंडाच्या  हृदयपटलावर  कर्मयोगाचा  उदात्त  कायमचा  ठसा  उमटविलेला  आहे.  श्रीकृष्णाच्या  चारित्र्याने,    उपदेशाने  भारतीय  इतिहासाला  जे  वळण  लागले  आहे  ते  विश्वाच्या  अंतापर्यंत  टिकणारे  चिरकालीन  आहे.  श्रीकृष्णाचा  हा  ज्ञानोपदेश  सर्वांगाने  परिपुर्ण  आहे.  या  गीतेच्या  तत्त्वज्ञानाचा  संतश्रेष्ठ  ज्ञानेश्वर,  आद्य  शंकराचार्य,  मध्वाचार्य,  इस्कॉनचे  प्रभूपाद  स्वामी,  महायोगी  श्रीअरविंद  घोष,  लोकमान्य  टिळक,  आचार्य  विनोबा  भावे,  डॉ.  सर्वपल्ली  राधाकृष्णन  अशा  अनेक  भारतीय  विचांरवंतांनी  सखोल  अभ्यास  केला  आहे.  तसेच  जगभर  परदेशामध्ये   गीतेची  १३३  भाषांतरे  इंग्रजी  भाषेमध्ये,  २१  भाषांतरे  जर्मन  भाषेमध्ये  अशा  परदेशी  विचारवंतांची  गीतेवरील  विवेचने  प्रसिध्द  झालेली  आहेत.  प्रा.  आर.  सी.  झीनर  यानी  १९७०साली  गिफोर्ड  लेक्चर्स  मध्ये  सांगितले  होते  की  जगातील  ७५  मुख्य  भाषांमध्ये  सुमारे  २०००हून  आधिक  भाषांतरे  झालेला  भगवद्गीता  हा  भारतीयांचा  तत्त्वज्ञान  विषयक  ग्रंथ  बायबलच्या  खालोखाल  लोकप्रिय  झालेला  जगामध्ये  दुस-या  क्रमांकाचा  धार्मिक  ग्रंथ  आहे.  तसेच  इ.स.  १७८५  ते  १९८५  या  दोनशे  वर्षामध्ये  गीतेची  २८७  भाषांतरे  इंग्रजीत  प्रसिध्द  झालेली  आहेत.
प्राचीन  इतिहासामध्ये  संशोधन  केल्यानंतर  श्रीकृष्णाचे  चरित्र  हरिवंश,  महाभारत,    भागवत  अशा  तीन  पुराणांमध्ये  प्रामुख्याने  दिसून  येते.  अलौकीक  शक्तीचा  प्रत्यय  दाखविला  तर  तो  मानवाचा  आदर्श  होत  नाही.  त्यामुळे   श्रीकृष्णाच्या  जीवनामध्ये  स्वकार्यासाठी  अमानवी  शक्तीचा  उपयोग  केलेला  नाही.  जिथे  आता  तो  दिसतो  तो  नंतर  घातलेला  आहे  असे  संशोधकांचे  मत  आहे.  महाभारतातील  उद्योगपर्वामध्ये  एके  ठिकाणी  आपल्या  मनुष्यत्वाचा  श्रीकृष्णाने  स्पष्टपणे  उल्लेख  केला  आहे.  तो  म्हणतो  पुरूषाला  जे  करणे  शक्य  आहे  ते  मी  करू  शकतो.  देवालाच  जे  करणे  शक्य  आहे  ते  कार्य  मी  कसे  करू  शकेन.  येथे  अजून  स्पष्ट  होते  की  श्रीकृष्ण  हा  युगपुरूष  होता.  योग्यवेळी  योग्य  निर्णय  घेण्याची  कृष्णाची  क्षमता,  निस्वार्थपणे  दोन  पक्षामध्ये  मध्यस्थी  करण्याची  त्याची  क्षमता,  ज्याच्यासाठी  लढायचे  ते  श्रध्देय  समाजाच्या  हिताचे  असेल  तर  कशाचेही  बलिदान  करायला  माणसाने  सिध्द  असले  पाहिजे  ही  त्याची  धारणा  युगपुरूषाला  साजेशीच  होती.  श्रीकृष्ण  कोणत्याही  समस्येचे  मूळ  प्रथमतः  समजावून  घेत  असे.  नंतर  हे  मूळ  शोधण्यासाठी  त्याच्याकडे  भूतकाळाची  जाण,  वर्तमानकाळाची  समज    भविष्यकाळाचा  परिणाम  याचे  ज्ञान  स्वभावतःच  होते.  अशा  रितीने  श्रीकृष्ण  द्रष्टा  तत्त्वज्ञानी  होता  हे  त्याच्या  संपुर्ण  जीवन  चरित्रावरून  समजते.
श्रीकृष्ण  युगपुरूष  होता  या  मताचा  ख्यातनाम  संशोधक  डॉ.ए.डी. पुसाळकर  यांनी  आपल्या  स्टडीज  इन    इपिक्स  अँड  पुराणाज  या  भारतीय  विद्याभवन,  मुंबई  यांनी  प्रसिध्द  केलेल्या  ग्रंथामध्ये  कृष्णाची  ऐतिहासिकता  नामक  पाचव्या  प्रकरणामध्ये  विचार  स्पष्ट  केला  आहे.  तर  दुर्गा  भागवत  आपल्या  पुर्ण  पुरूष  या  लेखातील  व्यासपर्वामध्ये  म्हणतात,--  जीवनाच्या  सर्व  बाजूंना  स्पर्श  करणारा,  व्यक्ती  व्यक्तींच्या  सुखदुःखाचे  स्पंदन  भोगून  त्यांचे  जीवन  कृतार्थ  करणारा  कृष्ण  आज सुध्दा  चिंतनीय  आहे  कारण  तो  नुसताच  मानव  नसून  एक  युगपुरूष  आहे.  महाभारतातील  व्यक्तीदर्शन  नामक  आपल्या  ग्रंथातील  कृष्णावरील  लेखात  डॉ.  शंकर  पेंडसे  म्हणतात,  --  कृष्ण  विष्णूचा  अवतार  होता  ही  कल्पना  प्रस्तूत  होण्यास  कृष्णच  जबाबदार  होता.  दुष्टाचा  संहारक,  गरिबांचा  उध्दारक,  लोकशाहीचा  प्रवर्तक,  निःस्वार्थ  समाससेवक,  समाजशत्रूंचा  निर्दालक  आणि  समाजातील  सुवृत्तांचा  पाठिराखा,  बुध्दिमान,  मुत्सद्दी  योध्दा  आणि  सार्वकालीन  महत्वाच्या  कर्मयोग  तत्त्वज्ञानाचा  उद्गाता  ही  कृष्णाची  प्रतिमा  डोळ्यासमोर  आणली  की  कृष्ण  पुराणांनी  ठरविलेला  विष्णूचा  अवतार  होता  म्हणून  मोठा  नसून  तो  स्वतः  सिध्द  ऐतिहासिक  महापुरूष  होता  हे  लक्षात  येते.  श्रीकृष्णासारखा  पुरूष  पुर्वी  कधी  झाला  नाही  आणि  पुढे  कधी  होणार  नाही  असे  मत  तर्कतीर्थ  लक्ष्मणशास्त्री  जोशी  यांनी  विश्वकोशामध्ये  व्यक्त  केले  आहे.
१९५४  साली  जपानमध्ये  झालेल्या  द्वितीय  विश्व  तत्त्वज्ञान  परिषदेमध्ये  प.पू.पांडुरंगशास्त्री  आठवले  म्हणतात,--श्रीकृष्णाचे संपुर्ण तत्त्वज्ञान  हे  तत्कालिक  नसून  चिरंतन  आहे.  संपुर्ण  जगाला  आत्मोन्नतीचा  आणि  समाजोन्नतीचा  चिरंतन  विचार  देणारा  श्रीकृष्ण  हा  एकमेवाद्वितीय  पुरूष  होता.  त्याच्या  तत्त्वज्ञानामध्ये  धर्माचा  अर्थ  प्रांतिक  किंवा  राष्ट्रिय  असा  मर्यादित  नसुन  अखिल  मानवजातीमध्ये  स्नेहभाव,  सद्वर्तन  आणि  सामंजस्य  निर्माण  व्हावे  हा  विश्वव्यापक  अर्थ  दिसतो.
अशा  रितीने  थोडक्यात  श्रीकृष्णाचे  व्यक्तीमत्वाच्या  दृष्टीने  आढळलेले  गुणविशेष  त्याच्या  विलक्षण  विभूतीमत्वाची  साक्ष  देतात.  व्यवहारीक  आणि  बौध्दिक  क्षेत्रात  आमूलाग्र  परिवर्तन  घडवून  धर्माधर्माचा  व्यावहारीक  विचार  जनसामान्यापुढे  ठेवून जीवनमूल्यांच्या  रक्षणासाठी  आवश्यक  अशा  शासनाची,  धर्मराज्याची  निर्मिती  करून  श्रीकृष्णाने  जे  जे  अभूतपुर्व  कार्य  केले त्यातून  त्याचे  युगपुरूषत्व  सिध्द  होते  हे  मान्य  करावे  लागेल.


स्वामी मोहनदास,  एल  ५०७  चंद्रमा  डिएसके  विश्व  धायरी  पुणे-४११०४१ 

Thursday, 7 November 2019

PRSEC/E/2019/21448


Very urgent to be replied as it is written with blood of PATRIOT  
To
The President of India. (vide PRSEC/E/2019/21448)
New Delhi

Sub. -- violation of the CONSTITUTION OF INDIA

WE, THE PEOPLE OF INDIA, having solemnly resolved to constitute India into a
1[SOVEREIGN SOCIALIST SECULAR DEMOCRATIC REPUBLIC] and to secure to all its citizens:
JUSTICE, social, economic and political;
IN OUR CONSTITUENT ASSEMBLY this twenty sixth day of November, 1949, do HEREBY
ADOPT, ENACT AND GIVE TO OURSELVES THIS CONSTITUTION.
TODAY IN 2019 ALMOST 10% OF INDIANS OWN 80% OF THE COUNTRY’S WEALTH.
40% OF INDIANS OWN ONLY 15% OF THE COUNTRY’S WEALTH.
AND REST 50% OF INDIANS OWN  0NLY 5% OF THE COUNTRY’S WEALTH.
IS IT JUSTICE ECONOMIC TO ALL ITS CITIZENS
THIS  SHOWS  ATTITUDE OF THE  ALL MEMBERS OF PAIRLMENT
THIS  SHOWS  BEHAVIOUR  OF THE  ALL MEMBERS OF PAIRLMENT
THIS  SHOWS  CHARACTER  OF  THE  ALL MEMBERS OF PAIRLMENT
THE EX ECUTIVE POWER OF THE UNION SHALL BE VESTED IN THE PRESIDENT AND SHALL BE EXERCISED BY HIM EITHER DIRECTLY OR THROUGH OFFICERS SUBORDINATES TO HIM IN ACCORDANCE WITH THE CONSTITUTION. (PART V ARTICLE 53)
ONLY ONE PATRIOT SWAMI MOHANDAS IS VERY MUCH eager FOR THE governance of the country as per the Constitution.  BUT WHO CARES.
07-11-2019
casteless-india.blogspot.in            E ENEQUALITY     casteless.india20@gmail.com

COPY TO EVERY CITIZEN OF INDIA TO THOUGHT OVER FOR THE NATION

Sunday, 3 November 2019

PRSEC/E/2019/20912


Being circulated to all over India
To
The President of India,  (vide  PRSEC/E/2019/20912)
New Delhi

Sub. -- CONSTITUTION OF INDIA

विषय—संविधानानुसार प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत कर्त्यव्यांचे महाराष्ट्रभर  प्रबोधन करणे           
आजच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी संविधानानुसार प्रत्येक भारतिय नागरिकांच्या मूलभूत कर्त्यव्यांचे पालन करण्यासाठी संविधान प्रबोधन अभियान सुरू केलेले आहे.
तरी आपल्या स्तरावर सर्व नागरिकांचे खालील प्रमाणे प्रबोधन करण्याची इच्छा आहे,  त्यासाठी नियोजन करून कळवावे ही विनंती.
संविधाना नुसार नागरिकांची मूल कर्तव्ये  (भाग चार-क  ५१क )
(क)संविधानाचे पालन करणे आणि त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, व राष्ट्रगीत यांचा आदर करणे ;
(ख)ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय लढ्यास स्फृर्ती मिळाली त्या उदात्त आदर्शांची जोपासना करून त्यांचे अनुसरण करणे ;
(ग)भारताची सार्वभौमता, एकता व एकात्मता उन्नत ठेवणे व त्यांचे संरक्षण  करणे ;
(घ)देशाचे संरक्षण  करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे;
(ङ)धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाउन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे; स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणाऱ्या प्रथांचा त्याग करणे ;
(च)आपल्या संमिश्र संस्कृतीच्या समृध्द वारशाचे मोल जाणून तो जतन करणे;
(छ)वने, सरोवरे, नद्या व वन्य जीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा आणि प्राणिमात्रांबद्दल दयाबुध्दी बाळगणे ;
(ज)विज्ञाननिष्ठ  दृष्टीकोन, मानवतावाद आणि शोधकबुध्दी व सुधारणावाद यांचा विकास करणे ; 
(झ)सार्वजानिक मालमत्तेचे  रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक   त्याग करणे ;
(ञ)राष्ट्र सातत्याने, उपक्रम व सिध्दी यांच्या चढत्या श्रेणी गाठत अशा प्रकारे व्यक्तिगत व सामुदायिक स्वरूपाच्या सर्व कार्यक्षेत्रात पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी झटणे ;
(ट)मातापित्याने किंवा पालकाने सहा ते चौदा वर्षां दरम्यानचे आपले अपत्य  किंवा, यथास्थिती, पाल्य याला शिक्षणाच्या संधी देणे ;

संविधानानुसार(भाग कलम ३८-५१) कायदे करताना राज्य धोरणांची निदेशक तत्वे लागू करणे महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य आहे. आमदार सत्ताधारी पक्षातील मंत्री असेल तर त्याने या सर्व कर्तव्यांचे पालन केले पहिजे. आमदार सत्ताधारी पक्षामध्ये असेल तर त्याने या सर्व कर्तव्यांचे पालन करण्यासाठी मंत्र्यांना प्रवृत्त केले पहिजे. आमदार विरोधी पक्षामध्ये असेल तर त्याने या सर्व कर्तव्यांचे पालन करण्यास मंत्र्यांना सहकार्य केले पहिजे. तसेच या सर्व कर्तव्यांचे पालन करण्या-या मंत्र्यांना विरोध केला पहिजे. कलम ३८.()नुसार राज्य सरकारने परिणामकारक रीतीने, सामाजिक, आर्थिक राजकिय न्यायाद्वारे राष्ट्रीय  जीवनाच्या सर्व घटकांमध्ये प्रेरणा निर्माण करील अशी समाजव्यवस्था प्रस्थापित केली पाहीजे. कलम ३८.()नुसार विशेषत: केवळ व्यक्ती-व्यक्तींमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रामध्ये राहणा-या किंवा निरनिराळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसमुहांमध्ये देखील, उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता कमी करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले पाहीजेत. कलम४०.नुसार राज्य सरकारने ग्रामपंचायती संघटीत करण्यासाठी उपाय योजना करून त्यांना स्वराज्याचे मूल घटक म्हणून कार्य करण्यास समर्थ करण्यासाठी आवश्यक असतील असे अधिकार प्राधिकार बहाल केले पाहिजेत. कलम४१. नुसार  राज्य सरकारने आपली आर्थिक क्षमता विकास यांच्या मर्यादित कामाचा शिक्षणाचा हक्क आणि बेकारी, वार्धक्य, आजार विकलांगता यांनी पिडित अशा व्यक्तींच्या बाबतीत आणि काहिहि अपराध नसताना हलाखीचे जिणे ज्यांच्या वाट्याला आले आहे अशा अन्य व्यक्तींच्या बाबतीत लोकसहाय्याचा हक्क उपलब्ध करून देण्यासाठी परिणामकारक तरतूद केली पाहिजे.
कलम४३.नुसार राज्य सरकारने अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा आर्थिक सुसंघटन करून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने शेतकी, औद्योगिक  अथवा अन्य प्रकारच्या सर्व कामगारांना काम, निर्वाह वेतन, समुचित जिवनमान आणि फुरसतीचा आणि सामाजिक सांस्कृतिक संधीचा पूर्ण उपयोग याची शाश्वती देणारी कामाची परिस्थिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि विशेषत: ग्रामिण क्षेत्रामध्ये वैयक्तीक किंवा सहकारी तत्त्वावर कुटीरोद्योगांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे. कलम४३ .नुसार  राज्य सरकारने कोणत्याही उद्योगधंद्यात  गुंतलेले उपक्रम, आस्थापना किंवा अन्य संघटना यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागी होता यावे यासाठी, अनुरूप विधिविधानाद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाने उपाययोजना केली पाहिजे. कलम४५.नुसार  राज्य सरकारने बालकांसाठी, त्यांच्या वयाची सर्व  वर्षे पूर्ण होई पर्यंत, प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण यांची तरतूद करण्या करिता प्रयत्न केला पाहिजे.
कलम४६.नुसार  राज्य सरकारने जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषत: अनुसूचित जाती आणि अनुसूचित जनजाती यांचे शैक्षणिक आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करून आणि सामाजिक अन्याय सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण केले पाहिजे. कलम४७.नुसार राज्य सरकारने आपल्या जनतेचे पोषणमान राहणीमान उंचावणे आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे यास प्राथमिक कर्तव्य मानून आणि विशेषत: मादक पेये आरोग्यास अपायकारक अशी अंमली द्रव्ये यांचे औषधीय प्रयोजनाखेरीज सेवन करण्यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे. कलम४८.नुसार  राज्य सरकारने शास्त्रीय पध्दतीने कृषी पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावण्यासाठी प्रयत्नशील राहीले पाहिजे आणि विशेषत: गाई वासरे आणि इतर दुभती जुंपणीची गुरे यांच्या जातीचे जतन  करून त्या सुधारणे आणि त्यांच्या कत्तलीस मनाई करणे याकरिता उपाययोजना केल्या पाहिजेत. कलम४८ .नुसार  राज्य सरकारने हे पर्यावरणाचे संरक्षण संवर्धन करण्यासाठी आणि वने वन्य जीवसृष्टी यांचे रक्षण करण्यासाठी  प्रयत्नशील राहीले पाहिजे.
ONLY ONE PATRIOT SWAMI MOHANDAS IS VERY MUCH eager FOR THE governance of the country as per the Constitution. 
BUT WHO CARES.

01-11-2019

casteless-india.blogspot.in       circular2019     casteless.india20@gmail.com